पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
उद्धव ठाकरे ह्यांचा राजीनामा आणि पुढे श्रीधर तिळवे नाईक  संन्याशाला  सगळी घरं जशी सारखी तसे सगळे पक्षही सारखेच ! त्याची कमिटमेंट फक्त लोककल्याणाशी ! सिद्ध हा मोक्षाचे शरीर , द्वादशशीलता ही त्वचा , सभ्यता ही मोक्षाचा अलंकार असेल तर सुसंस्कृतपणा हा मोक्षाचा वाचा आहे उद्धव ठाकरे ह्यांची वाचा व वाणी ही माझ्या कायमच आदराचा विषय राहिली आहे आजचे त्यांचे भाषण हे सभ्य वाचेचे सुसंस्कृत सादरीकरण होते . वाचाळांच्या जगात हे अतिशय दुर्मिळ ! न्यायालयाचा निकाल , त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा व विधानपरिषदेचा राजीनामा हे सर्व अपेक्षित होते मात्र जाताना त्यांनी जनतेचे डोळे ओले केले हे निश्चित ! पुढची इलेक्शन भाजपला त्यामुळे जड जाणार हे निश्चित ! शेवटच्या बैठकीत त्यांच्यासोबत फक्त चारजण असावेत ह्या घटनेतून हा राजीनामा आलेला असावा अन्यथा फ्लोर टेस्टपर्यंत हे सर्व गेले असते अशोकरावांनी आम्ही बाहेरून पाठिंबा देतो हे केलेले सूतोवाच अखेरचे प्रयत्न होतं . आता प्रश्न असा कि भाजपशी युती झाल्यावर शिंदे सेना काय करणार ? अहंकार ही अशी गोष्ट आहे कि ती शिंदे ह्यांना मातोश्रीवर जाण्यापासून थांबवणार म्हणजेच शिंदेंना अहंकार