शैव आणि बरंच काही श्रीधर तिळवे नाईक 

शैवांची अवतरणे आणि वैदिकांचे अवतार श्रीधर तिळवे नाईक 

गेली काही शतके ज्या काही गोष्टींचा प्रचार शिव धम्माबाबत होतो आहे त्यापैकी एक म्हणजे शैवांच्यात अवतार ही संकल्पना थेट प्राचीन काळापासून आहे वस्तुस्थिती काय आहे अवतरण ही संकल्पना शैवांना प्राचीन काळापासून माहीत आहे आणि गंगेचे अवतरण प्रसिद्धही आहे पण मूळात अवतरण ही संकल्पना काय आहे शैव अनेकदा मत्स्य ,कासव वा वराह ह्यांचे पूजन करत असल्याने हा गोंधळ झालेला आहे 

शैवांच्यात माणसाची आठ अवतरणे मानली आहेत माणूस गर्भात असतो तेव्हा माशासारखा गर्भात तरंगत असतो त्यामुळे मत्स्य हे पहिले अवतरण तो बाहेर आला कि कासवासारखा रांगायला लागतो पुढे थोडा तो वाढल्यावर डुकरासारखा कुठेही रांगत रांगत हुंदडायला लागतो मग तो सिंहासारखा दोन हात दोन पाय ह्यांचा परफेक्ट तोल सांभाळत रांगायला लागतो मग हळूहळू तो स्वतःच्या बळाने उभा राहतो आपण त्याला कौतुकाने बली म्हणतो मग तो हाताने वस्तू पकडायला शिकतो परसापर्यंत एकटाच जायला शिकतो म्हणून त्याला परश म्हणतात आणि मग हळूहळू तो आपल्या मागच्या पिढ्यातील स्त्री अथवा पुरुष ह्यांची लक्षणे दाखवायला लागतो राम म्हणजे मूळपुरुष हे मी मागेच सांगितले आहे म्हणून ह्या अवतरणाला राम म्हणतात ही सात अवतरणे संपली कि आठवे अवतरण कुमार असते इथे त्याला लैंगिकतेची चाहूल लागते कुमार /कुमारी ह्या शब्दाचा अर्थच मुळी ज्याला कामाची चाहूल लागली ती व्यक्ती ह्यानंतर तो अवतरण रहात नाही तर तरण बनते तरणाचे दोन प्रकार तरुण तरुणी सर्वांना माहीत आहेत    . 

वैदिकांचे अवतार हे काल्पनिक आहेत पण ते खरे आहेत अशी वैदिकांची श्रद्धा आहे शैवांची अवतरणे  ही  ह्या जगातली आहेत  त्यामुळेच शैवांच्या मंदिरापुढच्या तळ्यातील वा मंदिरापुढच्या समुद्रातील मासे व कासव व मंदिराबाहेरच्या लहान डुक्कर ह्यांना मारायला बंदी आहे ही श्रद्धा लहान मुलांना मारायला पूर्ण मनाई करते जोवर एखादे मूल राम अवतरणात  पोहचत नाही तोवर त्याच्यावर  हात उगारायला पूर्ण बंदी आहे व राम व कुमार अवतरणातही  कारणांशिवाय मारायला अनुमती नाही ह्याची सर्व शिवशक्तीगणपतीकार्तिकेय भक्तांनी दखल घ्यावी 

श्रीधर तिळवे नाईक 

शैव आणि वटपौर्णिमा श्रीधर तिळवे नाईक 

माझ्या गावाचे नाव बांदिवडे त्याचा अर्थच वडांनी बांदी केलेले म्हणजे वेढले गेलेलं किंवा वडांची (वैज्ञानिक नाव फिकस वा फायकस मायक्रोकार्पतटबंदी असलेलं गाव ! साहजिकच गावात वड भरपूर होते हळूहळू काही अतिशहाण्यांनी ते कापायला सुरवात केली मात्र माझे वडप्रेम पुढेही कमी झाले नाही संपूर्ण ब्रह्मांडाचा पसारा वडाप्रमाणे आहे ही शैव कल्पना त्याला शह म्हणून बौद्धानी बोधी तर वैष्णवांनी अश्वत्थ ह्या नावाने पिंपळ वृक्ष आणला गीतेत श्रीकृष्णाने वृक्षांच्यात मी अश्वथ असे सांगितले आहेच 

शैव आणि आर्य संस्कृतीतील हा वृक्षसंघर्ष हा त्यांच्या संस्कृती संघर्षाशी साजेसा आहे पुढे जेव्हा शैवांचे वडप्रेम कमी होईना तेव्हा ह्या वडाशी जी ऍडजस्टमेन्ट झाली त्यातून आत्ताची हिंदू सावित्रीक वटपौर्णिमा जन्मली जे बाहेरून पराभूत करता येत नाही ते स्वतःत सामावून घेऊन त्याचे देशीकरण करून गिळून टाकायचे ही आर्यांची सांस्कृतिक प्रथा आहे देशीवाद हे त्यासाठी शोधलेले आर्यांचे प्राचीन हत्यार आहे जे प्रत्येक गोष्टीचे आर्यीकरण करण्यात त्यांना मदत करते 

वडपौर्णिमेचे मूळ हे मुळात आकारलिंगात आहे भगवान शंकरानी 

महालिंग (हल्ली ह्यालाच शिवलिंग म्हंटले जाते)

शिवलिंग ह्यात प्रामुख्याने उभा आकार महत्वाचा असतो 

शक्तिलिंग ह्यात आडवा आकार महत्वाचा असतो तो गोलाकार किंवा रेषीय असा दोन्ही असू शकतो 

इष्टलिंग  हे मोक्षकांनी नव्याने शैव धम्म स्वीकारलेल्यांनी  गळ्यात घालायचे असते जे जन्मानेच शैव आहेत त्यांनी ते घालण्याची आवश्यकता नाही 

आकारलिंग ह्यात निसर्गाने निर्माण केलेल्या लिंगाकारांचा समावेश होतो 

अशी पंचलिंगे दिलेत त्यातील ज्यांचा आकार लिंगासारखा आहे त्यांची पूजा आकारलिंग म्हणून मान्य केली आहे ह्यात प्रामुख्याने डोंगर वृक्ष हे शिवलिंग म्हणून तर नदी शक्तिलिंग म्हणून येतात एका अर्थाने आदिवासींच्या डोंगरपूजेलावृक्षपूजेला नदीपुजेला हा शैव धम्माने दिलेला नवा आकार आहे आणि भक्तिमार्गाने ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांच्यासाठी लिंगपूजा सुचवली आहे 

वडाचे दोन प्रकार असतात 

पारा असलेला वड ह्या वडाजवळ वड म्हणून शिवलिंग   पारा म्हणून पार्वतीरूपात शक्तीचा  वास असतो म्हणूनच त्याला पारा म्हणतात आणि इथे गावाचे सर्व निर्णय पारावर बसून शिवशक्तीच्या साक्षीने घेतले जातात हे मिटिंगस्थळ आहे आणि इथं होणारे निर्णय हे शैवांनी मान्य करायचे असतात प्राचीन काळी गावाची पंचायत इथेच भरत असे पुढे शैव  रसदर्शनातल्या काहींनी (अय्यारी वा अल्केमिस्ट )मर्क्युरीलाच पारा समजून भरपूर प्रयोग केले जे चुकीचे होते असे आता विज्ञान सांगते 

पारा नसलेला वड ह्या वडाची पूजा शिवलिंग म्हणून होते 

प्राचीनकाळी स्त्रिया ह्या वडाची पूजा सृजनाचा ब्रह्मांडाचा मुख्य सोर्स शिव असल्याने शिवाचे प्रतीक म्हणून करत ही  पावसाप्रती आत्ताच्या भाषेत मान्सूनप्रती तो आला म्हणून व्यक्त केलेली कृतज्ञता असे शैवांचा पावसाचा देवही शिव असल्याने हे स्वाभाविक होते वैदिकांचा पावसाचा देव इंद्र असल्याने ते यज्ञ करून पावसाला सलामी देत तेही कृतज्ञता म्हणून योग्यच होते 

मूळ प्रथेनुसार पारा असलेला वडच पूजला जाई आणि ही वडपौर्णिमा हा संपूर्ण गावाचा विश्वास असे स्त्री ही सृजनशील मुलांना जन्म देणारी असल्याने तिनेच पावसाची पूजा करणे हे योग्य आहे असे मानले जाई म्हणून ह्या पूजा बायका करत हा उत्सव बायकांचा मानला जाई 

ह्यात मग सावित्रीसत्यवान  घुसली कुठं ? तर ज्या आर्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला शैव पूजा स्वीकारली त्यांना हा उत्सव इंटरेस्टिंग वाटला आणि त्याला स्वतःची आर्यन मिती जोडणे आवश्यक वाटले आर्यांचे मृत्यूवर विजय मिळवण्याचे स्वप्न , पुनर्जन्माचा सिद्धांत बायकांच्यावर ठसवण्याची युक्ती आणि सात जन्मात एकच पती मागितला तर सिद्ध होणारी पतिनिष्ठा ह्या तिन्हींचा संगम त्यांनी कुशलतेनं ह्या काल्पनिक कथेत केला पुढे जेव्हा काही शैवांनी भगवान शंकरांचा त्याग करून वैष्णव  धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी आपली मूळ मुळे छाटून ही कथा स्वीकारली आणि आज हीच कथा वैष्णव हिंदू वैष्णवांची मूळ कथा मूळ श्रद्धा बनलेली दिसते 

अलीकडे ह्याची दोन स्पष्टीकरणे धुमाकूळ घालतायत 

एक हिंदुत्ववादी स्पष्टीकरण आहे ज्याच्या मते १२ वर्षे म्हणजे एक जन्म सात जन्म म्हणजे  ८४ म्हणजे १६ व्या वर्षी लग्न झाले तर सात जन्म हाच पती म्हणजे शंभर वर्षे हाच पती मिळो अशी ही मागणी आहे वास्तविक शैवांच्यात १२ वर्षे म्हणजे तप होय जन्म न्हवे पण सोयीनुसार फिरवाफिरव करणे ही आर्यांची सवय असल्याने ही फिरवाफिरव आलेली आहे 

दुसरे देशीवादी स्पष्टीकरण आहे उत्तराधुनिकतेने प्रबोधनाच्या केंद्रस्थानी पुरोगामी लोकांनी ठेवलेली रिझन बुद्धी  नाकारली बुद्धिवादी तर्क अमानुष जंगलतोडीचं समर्थन करत असल्याने आता पर्यावरणाची रक्षा श्रद्धाच करू शकते असा स्टॅन्ड घेतला ह्या स्टॅन्डनुसार देशीवादी वृक्षपूजा ही पर्यावरणाचं रक्षण करत असल्याने तिचे समर्थन करतात आदिवासी लोकांच्या श्रद्धाच आता जंगले पर्यावरण वाचवतील ह्या श्रद्धेपोटी हे केलं जात आहे  चिपको आंदोलनाने त्याला आधारही पुरवलेला आहे बायकांनी वृक्षांना मिठ्या मारून वृक्ष वाचवलेले आहेत 

प्रश्न असा आहे कि आता करायचं काय ? आर्यन ऍंगल पुरुषसत्तेचा प्रचार करत असल्याने स्वीकारता येत नाही हिंदुत्ववादी स्पष्टीकरण पुरुषसत्तावाद नाकारत नाहीये आणि देशीवादी ऍंगल पुरुषसत्तावादाचं काय करायचं हे सांगताच त्याला पर्यावरणाचा अँगल जोडतोय 

ह्याला उपाय एकच आहे मूळ शैव अँगलचं नूतनीकरण ज्यात पुरुषसत्ताकवाद नाही उलट शिवशक्ती समानता आहे आणि ह्यासाठी का होईना पण वड जंगल जिवंत ठेवले पाहिजेत असा पर्यावरण प्रचारही करता येईल शिवाय नूतनीकरणात स्त्रियांबरोबर पुरुषांनाही फेरे मारण्यात सामील करून घ्यावे म्हणजे हा उत्सव दोघांचाही होईल मानवजातीच्या निर्माणतेत स्त्रीचा वाटा ९० टक्के पुरुषाचा फक्त १० टक्के आहे हे ह्यावेळी बिंबवावे म्हणजे स्त्रीपुरुष समानतेच्या बाजूने काही पावले पडतील माझ्या बालपणी माझी आई एकदा मला सोबत घेऊन गेली होती आणि फेरे मारताना मला मजा आली होती त्यामुळे स्वतःच्या मुलांना सोबत घेऊन फेरे मारले तर त्यांनाही ह्याची प्रॅक्टिस होऊन जाईल 

आणि आता जे रॅशनल आहेत त्यांचे काय ? तर त्यांनी झाडे वाचतील तर ऑक्सिजन मिळेल पाऊसही पडेल श्वास आणि पाणी ह्या दोन मूलभूत गरजा फक्त झाडांच्यामुळेच भागातील हे आपल्या मुलांच्यावर भवतालच्या माणसांच्यावर ठसवत राहावे उगाच वडाभोवती एकाच दिवशी गर्दी करण्यापेक्षा हा रॅशनल पर्याय केव्हाही अधिक चांगला आहे

शेवटी अनेक मेथड्सननी एकमेकाला पूरक ठरवत पर्यावरण वाचवणे पर्यावरण वाचणे सर्वात महत्वाचे

श्रीधर तिळवे नाईक  

ममता , माया , कामता  , भावंडता , आप्तता , गोतता , गणता , सख्यता  आणि मित्रता श्रीधर तिळवे नाईक 

असणे भवणे आणि भावणे ह्या माणसाच्या मूलभूत क्रिया आहेत ज्ञानेश्वरांनी ब्रह्मांडाला शिवाच्या असण्याची प्रभा म्हंटले आहे शिव अस  आहे असणे आहे आणि शक्ती प्रभा आहे आणि शिवशक्तीचे  नर्तन म्हणजे भवणे ह्यातून भवसागर तयार होतो ज्याचे स्वामित्व शक्तीकडे आहे 

शक्ती जगदंबा आहे आणि जगदंबेचा मूळ भाव ममता आहे बाकी सारे भाव हे ममतेपासून तयार होतात त्यातील पहिला भाव माया आहे माया आणि ममता ह्यांच्यात एक फरक आहे माया आंधळी असते कारण शिवाचा अक्ष तिच्यात सुप्त असतो तर ममतेत हा अक्ष जागृत असतो त्यामुळे तिचा विवेक जागा असतो मायेत मात्र विवेक ढळतो आसक्ती (आसक्तीत भूक , तृष्णा व निकड येतात ) ऍक्टिव्ह होते पहिली आसक्ती काम आणि ह्या कामापासून उत्क्रांती सुरु होते माणूस तयार होतो स्त्री पुरुष तयार होतात त्यामुळेच स्त्रीपुरुषांच्यात कामता आणि माया दोन्ही असतात आपण आईला माय म्हणतो ते तिच्या ठायी असलेल्या मायेमुळे किंबहुना जिच्या ठायी माया आहे ती माय जिच्याठायी ममता आहे ती माता म्हणूनच आपण शक्तीला माता म्हणतो आईचे दोन प्रकार होतात १ माता २ माय  आपण काय बनायचे हे प्रत्येक आईने स्वतः ठरवायचे असते बापातसुद्धा माया असते त्यांच्यापासून मुले जन्मतात ह्या मुलांच्यात ब्रदरहूड असतो मी बंधुभाव म्हणत नाही कारण एकतर त्यातून पुरुषसत्ताक सत्ता व्यक्त होते आणि अर्थ अर्धवट आहे त्यापेक्षा आपला भावंडता हा शब्द योग्य कारण एकमेकांबद्दल माया असणे आणि आपण एकाच मायेचे धारक आहोत हा भाव त्यातून व्यक्त होतो भावंडं म्हणजे एकमेकाबद्दल भाव असणारी व वन्ड म्हणजे एकत्र वाढलेली ! जो वन्डतो म्हणजे वाढवतो तो वडील आईबाप दोघेही जसे माय असतात तसे वडीलही असतात वांड हा शब्द त्यातूनच जन्मतो ज्याचा मूळ अर्थ धुसमुसळी वाढ झालेला ! भावंडांच्यात एखादा वा एखादी तरी वांड असतोच /असतेच . 

आप्त म्हणजे नातेवाईक ज्याच्याशी जनेटिक नाते आहे असे सर्व त्यात येतात आणि सर्व आप्तांत आप्तता असतेच ह्याला आपण म्हणतो आप्तावळ ! ह्या आप्ततेनंतर येते गोतता ! गोतता असलेला गोतावळा ! ह्याला आपण एक्स्टेंडेड फॅमिली म्हणतो हा खरे तर एक्स्टेंडेड आप्तावळ असते . जनेटिक नाते नसलेले पण तितकाच जिव्हाळा असलेले लोक ह्यात येतात ह्या गोतपासून पुढे संस्कृत गोत्र तयार झाले आणि सत्यानाश झाला मात्र आदिवासी लोकांच्यात आजही गोत टिकून आहे आजही आपण समस्वभावी किंवा सम-आवडीच्या माणसाविषयी त्याचे माझे तिचे माझे एकच गोत्र आहे आम्ही एकाच गोत्राचे म्हणतो तेव्हा त्या शब्दाचा मूळ अर्थ व्यक्त करत असतो 

ह्यानंतर येतात गणगोत म्हणजे एकाच गणात असलेले आपण सर्वच एकाच गोताचे असे आपण म्हणत असतो सध्या राष्ट्र हाच आपला गण आणि भारत हाच आपला गण ह्या गणाचे सर्व नागरिक आपले गणगोत होय समान हितसंबंध व समान कायदे हे गणगोताचे वैशिष्ट्य होय 

ह्या गणगोतातील ज्या लोकांशी आपली तार जुळते असे सर्व स्त्रीपुरुष आपले मित्र असतात ही तार कमीतकमी बौद्धिक किंवा भावनिक असावी लागते दोन्ही असेल तर आधीक उत्तम ! भावनिक तारेला आपण जिव्हाळा म्हणायचो आणि म्हणतो समता हा कुठल्याही मैत्रीचा पाया असतो समानता नसली तरी समता असू शकते म्हणजे उदाहरणार्थ आर्थिक समानता नसली तरी समता असू शकते मैत्रीत कसल्याच गर्वाला जागा नसते वर्ण जात धर्म ह्या गोष्टी गर्व निर्माण करतात म्हणून धर्मवर्णजातीला मैत्रीत स्थान नसते मैत्री दोन माणसांच्यातली असते माणसांच्यात असते आजची राजकीय परिस्थिती मैत्रीच्या विरोधी आहे किंबहुना राजकारण हे अमैत्रतेला खतपाणी पुरवणारे आहे आणि हे गणगोतता तर संपवतेच पण मैत्रीही संपवते 

मैत्रीत एकमेकांचे स्वातंत्र्य आपण मान्य केलेले असते आणि लोकशाहीचा मुख्य आधार नागरिकांच्यातील मैत्री असते हिला मी सामूहिक मित्रता म्हणतो ही सामूहिक मित्रता टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे 

वैयक्तिक मित्रता ही अधिक जिव्हाळ्यात बुडालेली असते तिथे एकमेकांचे स्पष्ट आकलन असते अलीकडे काही लोक मैत्रीत हेल्दी कॉम्पिटिशन स्वीकारार्ह मानतात कारण काही वेळा दोन मित्रांच्यात समान टारगेटसाठी स्पर्धा असते अशावेळी ही स्पर्धा आरोग्यदायी कशी ठेवायची हा एक खरेतर प्रश्नच आहे काहीजण तर हितसंबंध जर स्पर्धा घेऊन आले तर मैत्री होऊच शकत नाही अशा निर्णयाला आलेत माझ्या मते हा दोन व्यक्तींचा आसक्तीकरणाचा व आसक्तीवेगाचा प्रश्न असतो आसक्तीची (आसक्तीत भूक , तृष्णा व निकड येतात )अतिवाढ मैत्री संपवते हा माझा अनुभव आहे 

मित्र मैत्रिणी संबंधात एखादे नाते पतिपत्नीइतके जोडप्याइतके तीव्र होते मात्र शरीरसंबंध वर्ज्य असतात अशा नात्याला सख्यता म्हणतात व अपोझिटला सखा किंवा सखी म्हणतात शिव आणि गंगा ह्यांचे असे नाते होते (तिला पुढे नदी बनवून घोळ घातला गेला ) वैष्णवांच्या महाभारतात कृष्ण आणि द्रौपदी ह्यांच्यात असं नातं होतं असं दिसतं 

आजच्या काळात जोडप्यात माया , ममता , कामता , सख्यता असावीच लागते पण त्याचबरोबर मैत्रीही असावी लागते अन्यथा जोडपे सामाजिक व्यवहारात व व्यापारात विसंवाद निर्माण करत वावरायला लागते 

सर्वांशी समान मित्रता व सर्वांविषयी ममता मोक्ष प्राप्त झाला कि आपोआपच घडते पण तोवर मित्रता ही आपल्या अनेक संबंधाचा मुख्य आधार असते किंबहुना मोक्षाची साधना करणाऱ्यांना मित्रता साधावीच लागते अनेकदा बॅकस्टॅब करणाऱ्यांना क्षमा करावी लागते एखादा पुन्हापुन्हा बॅकस्टॅब करतो तेव्हा त्याला पुन्हापुन्हा क्षमा करावी लागते अशावेळी ज्यांना व्यवहार कळतो असे मित्र तुम्हाला मूर्ख वैग्रे म्हणतात तर ते ऐकून हे करावे लागते काही मात्र एक्दम जिवलग होऊन जातात त्यांचे असणे आल्हाददायक असते माझ्या सुदैवाने माझ्या मित्रांच्यात बॅकस्टॅब करणाऱ्या मित्रांच्यापेक्षा जीवलग असणाऱ्या मित्रांची संख्या अधिक होती तुम्हाला मोक्ष वैग्रे काल्पनिक किंवा अशक्य वाटत असेल तर मात्र बॅकस्टॅब करणाऱ्याला कितीवेळा क्षमा करायची त्या क्षमेचे लिमिट किती हे ज्याने त्याने ठरवावे हे उत्तम 

माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या आणि असणाऱ्या सर्व मित्रांना मी जीवलग प्रणाम करतो . 

श्रीधर तिळवे नाईक 






















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट