भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी युगामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच पुरोगामी विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या वर्गीय किंवा प्रवर्गीय किंवा वर्णीय किंवा जातीय हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे, इतिहास लेखनाचे संबंध हे सुद्धा हितसंबंधांच्या वर आधारित होते पुढे पुढे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेले विशेषता मिशेल फुको याने यासंदर्भामध्ये आर्किऑलॉजी ऑफ सेक्स अँड मॅडनेस मांडून अनेक गोष्टी उलगडल्या त्यामुळे पुरोगामी इतिहासाची भांडेफोड झाली साहजिकच पुरोगामीवादाची अजूनही जी रोमँटिक कल्पना भारतीय इतिहासकारांच्या मध्ये विशेषता मार्क्सवादीं आणि आंबेडकरवादी लोकांच्या मध्ये आहे ती उत्तराधुनिक किंवा चौथ्या नवतेच्या नवीन लोकांच्या इतिहासरचनेमध्ये आढळत नाही याउलट आपण जर का हिंदुत्ववाद्यांच्या कडे पाहिले तर त्यांना आपण काय करतो आहोत आणि आपण इतिहास वैज्ञानिक पद्धतीने मांडत नसून आपण इतिहास रचत आहोत याची स्पष्टपणे जाण होती असे दिसते किंवा अशी शंका येते स्वतःचे प्रतिगामी हितसंबंध सांभाळणे हीच सुरुवातीची मनशा दिसते अशी जाणीव समजा नसेल तर एक गोष्ट नक्की आहे हिंदुत्ववादी लोक सुद्धा स्वतःचा इतिहास स्वतःचे हितसंबंध जपतच इतिहास निर्माण करत असतात रचत असतात करत होते रचत होते .
भारताच्या पाठ्यपुस्तकातले इतिहास असे अनेकदा हितसंबंधांच्यावर आधारित विशेषत: सरकारच्या हितसंबंधावर आधारित आणि त्या सरकारने स्वीकारलेल्या विचारप्रणालीवर आधारित असलेले दिसतात त्यामुळे आपण शाळेत आणि कॉलेजला शिकलेला इतिहास हा एक रचला गेलेला इतिहास आहे हे कळणेच अनेक विद्यार्थ्यांना अशक्य होऊन बसले आणि आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या मध्ये शिकवला गेलेला इतिहासच खरा आहे असे मानणारे अनेक विचारवंत निर्माण झाले जे आजही कार्यरत आहेत ज्याचे राज्य त्याचा अभ्यासक्रम ही प्राचीन काळापासून असलेली एक वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचे काय करायचे हे भल्या भल्या इतिहासकारांना आणि विचारवंत लोकांना कळत नाही आश्चर्याची गोष्ट अशी की किमान ही वस्तुस्थिती स्वीकारावी असेही अजूनही अनेकांना वाटत नाही साहजिकच आमची पिढी जी चिन्हकी मध्ये जन्मली आणि जालकीमध्ये वाढली होती तिला यासंदर्भामध्ये अत्यंत खोलात जाऊन चौकशी करण्याची वेळ आली आहे त्यातूनच चौथ्या नवतेचे इतिहास आता आकाराला येताना दिसतात
भारत हे कधीही धार्मिक दृष्ट्या एकधर्मी भौगोलिक सातत्य नसल्याने वेगवेगळ्या धर्माच्या आणि दर्शनाच्या आणि मोक्षाच्या मांडणीमुळे वेगवेगळ्या काल खंडाची निर्मिती करताना दिसतो वेगवेगळ्या काल गणनांची निर्मिती करताना दिसतो साहजिकच भारतामध्ये अनेक कालगणना गजबजलेल्या दिसतात प्रत्येक जण आपल्या हिशेबाने काल गणना करत असल्याने कालगणनांची एक दाटीवाटी आपणाला भारताच्या इतिहासामध्ये आढळते आणि प्रत्येक स्कूल ला स्वतःची कालगणना सुनिश्चित करून घ्यावी लागते म्हणजे डाव्या लोकांना इतिहास लिहिताना लोकायतांचा आधार असतो आणि ते शक्यतो त्यांचा इतिहास लोकायतांच्या पासून सुरुवात करायला बघतात किंवा मग प्राक्ऐतिहासिक कालखंडातील उत्पादन साधनांच्यावर ते लक्ष केंद्रित करतात तर आंबेडकरवादी इतिहासकार शक्यतो बुद्धाला केंद्रस्थानी ठेवायला धडपडतात खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्मावर असलेल्या कपिलच्या प्रभावाची चर्चा केलेली असूनही ते कपिलकडे येत नाहीत कारण कपिल कडे आले की शैव लोकांच्याकडे यावे लागते आणि ते त्यांना करायचे नाही.
आज 21 व्या शतकात सुद्धा त्यामुळेच श्रद्धा, धर्म किंवा मोक्ष (धम्म) या तीन गोष्टी इतिहास लिहिताना डॉमिनेट करत जातात उदाहरणार्थ व्हीं डी महाजन यांच्यासारखा अत्यंत प्रोफेसर टाईप लिखाण करणारा मनुष्य सुद्धा नकळतपणे हिंदुत्ववादी आणि वैदिक असतो आणि हा भारतीय अभ्यासक्रमामध्ये फार प्रमाण मानला जाणारा विद्यार्थी प्रिय लेखक आहे आणि असे असून सुद्धा तो त्याच्या वैदिक धर्मापासून मुक्त होत नाही असेच आपण जर का आंबेडकरवादी लोकांचा विचार केला तर आपणाला स्पष्टपणे दिसते की त्यांच्या कालगणनेवर गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे त्याचबरोबर गौतम बुद्ध हा केंद्रस्थानी ठेवण्याची ही धडपड दिसते त्यामुळेच आंबेडकरवादी इतिहासकार व इतिहास भारतीय इतिहास हा बुद्ध पूर्व , बुद्धकालीन आणि बुद्धोत्तर अशा तऱ्हेने विभागताना व विभागणी करताना दिसतात प्रत्यक्षामध्ये हा अहंकार आहे या उलट आपण जर का वैदिक लोकांच्याकडे गेलो तर ते आपल्या कालगणनेची सुरुवात वेदांच्या पासून करतात सिंधू संस्कृतीचा शोध लागण्याआधी भारतामध्ये इतिहास लिहिताना कायमच वेदांच्या पासून सुरुवात केली जात होती आणि आर्य हेच भारतीय संस्कृतीचे निर्माते आहेत असे भासवले जात होते साहजिकच सिंधू संस्कृतीचा जेव्हा शोध लागला आणि तिथे शिवलिंगे आढळायला लागली तेव्हा मात्र या सर्व लोकांची पंचाईत होऊन गेली कारण अशा प्रकारचा काही इतिहास या लोकांनी गृहीत धरला नव्हता आजही या इतिहासाचे काय करायचे या शिवलिंगांचे काय करायचे याबद्दल अनेक वादविवाद आहेत त्यातूनच मग हे शिवलिंग शिवलिंग नाही ते ग्रीक लोकांच्या मध्ये आढळणाऱ्या सृजनपूजेचा व अंधश्रद्धेचा भाग आहे हे सिद्ध करायला धडपडावे लागते पशुपतिनाथ हा पशुपतिनाथ नाही अशातऱ्हेची मांडणी करत चकवा द्यावा लागतो त्यासाठी अनेक फालतूचे सिद्धांत मांडावे लागतात अलीकडच्या काळात तर वैदिक लोकांनी सिंधू संस्कृती आपली संस्कृती होती असे भासवायला सुरुवात केलेली आहे जे अत्यंत चुकीचे आहे काही बौद्ध विद्वानांनी यासंदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक बुद्धाच्या आधीचा जो बुद्ध वंश होता त्याची रिलेशनशिप सिंधू संस्कृतीशी जुळवता येईल का ते ताडायला सुरुवात केलेली आहे किंवा मग आदिवासी लोकांशी ही संस्कृती निगडित करण्याची धडपड चालू झालेली दिसते काही लोकांनी तर आपले क्षत्रिय वंशज या संस्कृतीत शोधायला सुरुवात केली आहे येन केन प्रकारे बहुजन समाजाचा इतिहास डावलायचा आणि त्या जागी ब्राह्मण इतिहास किंवा क्षत्रिय इतिहास रचायचा असा हा डाव आहे आणि यामागे ब्राह्मणी इतिहासकारांचे संबंध आणि क्षत्रिय इतिहासकारांचे हितसंबंध कार्यरत असतात हे अत्यंत स्पष्ट आणि उघड आहे त्यामुळेच भारतीय इतिहासामध्ये अलीकडे ब्राह्मणी विचारवंत आणि क्षत्रिय विचारवंत यांच्यात लढाई चाललेली दिसते गमतीचा भाग असा की दोघेही स्वतःला वैष्णव किंवा ब्राह्मणी म्हणून घेत असतात दोघांनाही राम आणि कृष्णाची गरज लागते दोघांनाही रामायण आणि महाभारत प्रमाण मानावेसे वाटते
अशा या हितसंबंधांच्या वर आधारित असलेल्या अनेक प्रकारच्या भारतीय इतिहासांच्यातून मार्ग काढणे हे अत्यंत कठीण आहे या सगळ्यातून एक विचित्र गोष्ट पण उदयाला येते ते म्हणजे पुरातत्वीय पुरातत्वशास्त्रीय विवेचन! अनेक लोक पुरातत्त्व शास्त्राला प्रमाण मानत आणि बौद्ध इतिहास हा प्रामुख्याने पुरातत्वीय प्रमाणामध्ये सर्वाधिक पुरावे देणारा इतिहास असल्याने संपूर्ण भारत बौद्धमय असल्याची अत्यंत रोमँटिक कल्पना करत राहतात त्या उलट वैदिक विशेषता सर्व यूरोशिअन त्यातही अधिक ब्राह्मणधर्मीय लोक ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आता अलीकडे काही शूद्रही येऊ लागलेले आहेत सर्वच काही वैदिक असल्याचे भासवत राहतात इथे अनेकदा वैदिक म्हणजे ब्राह्मणी असे समीकरण असते आणि त्यामुळेच खरोखरच वैदिकतेचे ब्राह्मणी धर्माशी काय नाते आहे याची चर्चा सुद्धा केली जात नाही
मी सातत्याने सांगतो आहे की वैदिक धर्म वेगळा आणि ब्राह्मण धर्म वेगळा ! अजून तरी हे फार काही मान्य होताना दिसत नाही अनेकदा ब्राह्मणांनी वैदिक धर्म ताब्यात घेतल्यामुळे वैदिक धर्म हाच ब्राह्मण धर्म असे समीकरण सरसकट स्वीकारण्याची प्रवृत्ती झालेली दिसते वास्तविक चार वेदांच्या मध्ये जी सूक्ते दिलेली आहेत ती स्पष्टपणे ऋषींची नावे सांगतात आणि त्यावरून वेद हे ऋषींनी रचलेले आहेत हे स्पष्ट आहे परंतु तरीही ब्राह्मण कोणत्या अधिकाराखाली वेद आपले म्हणतात हा एक खरोखरच प्रश्न आहे आणि ब्राह्मणेतर वैदिक लोक वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली का करतात हा एक खरे तर भारतीय इतिहासातील कळीचा प्रश्न आहे वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली करणारे विचारवंतांना सर्व ब्राह्मणेतर वैदिक कसे स्वीकारतात हाही खरोखर प्रश्न आहे . की अजूनही या ब्राह्मणेतर इतिहासकारांना आपल्या लिहिलेल्या इतिहासाला ब्राह्मणांनी मान्यता द्यावी असे वाटत असते ? असाही प्रश्न उद्भवतो उदाहरणार्थ सदानंद मोरे यांना नेहमीच ब्राह्मण इतिहासकारांची मान्यता गरजेची वाटत असते असे दिसते
एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे युरेशियन लोकांनी वैदिक श्रद्धेपासून धर्मापासून सुरुवात करत मग ब्राह्मण धर्म मग वैष्णव धर्म आणि अलीकडे हिंदू धर्म निर्माण केलेला आहे या हिंदू धर्मात सामील व्हायचे की नाही असा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये काही इतिहासकारांनी वैदिक विरुद्ध हिंदू अशी ही मांडणी केलेली दिसते उदाहरणार्थ पार्थ पोळके किंवा नंतर संजय सोनवणी वास्तविक हिंदू हे वैदिकांच्या पेक्षा वेगळे नव्हेच परंतु ते तसे असल्याचे सांगितले जाते खरी गोष्ट अशी आहे की शैव हा संपूर्णपणे स्पष्टपणे स्वतंत्र श्रुती असलेला असा मुख्य भारतीय आणि भारतीयांचा आदीधर्म आहे सततचा खोटा प्रचार झाल्याने अनेक शैव स्वतःला हिंदू समजतात आणि त्यातूनच आत्ताचे बहुजन समाजातले अनेक गोंधळ निर्माण झालेले आहेत आणि सर्व विचारवंतांनी हा सगळा गोंधळ कमी करण्याऐवजी अधिकाधिक वाढवलेला दिसतो ब्रिटिशांनी त्यांचे भारतीय साम्राज्य संघटित राखण्यासाठी जे कलोनियल हिंदू मेटॅनारेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण केले आणि मग भारतीयांनाही ते स्वीकारायला भाग पाडले आणि सुरुवात करून ते डेव्हलप करायला पुढे हातभारही लावला आणि सर्वांनाच हिंदू या कॅटेगरी खाली एकत्र आणण्याचा जो खटाटोप केला त्या साम्राज्यवादी व वसाहतवादी खटाटोपामुळेच हे सर्व घडते आहे आज अवस्था अशी आहे की सर्व शैव जे इथल्या एका अर्थाने आदिवासी पासून ते पंडितांच्या पर्यंत मोठा आणि विशाल असा कॅनवास घेऊन उभे आहेत त्यांना आता पूर्णपणे स्वतःची आयडेंटिटी नव्याने शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय उच्चभ्रू इतिहासकार हे होऊ देत नाहीत त्या मागचे नेमके राजकारण काय आहे हे एकदा गजानन मुक्तिबोध यांच्या शैलीत विचारले पाहिजे क्या पॉलिटिक्स हैं?
अलीकडे हिंदुत्ववाद्यांनी त्यामुळेच सनातन धर्म ही संज्ञा वापरायला सुरुवात केलेली दिसते. हिंदूही संज्ञा वापरणे परवडत नसल्याने हे घडलेले दिसते पण हा यावरचा उपाय आहे का हाही खरे तर प्रश्न आहे हिंदू या शब्दाबाबत असून अडचण नसून खोळंबा अशी ही पंचायत आहे
प्राचीन भारतीय इतिहास हा साधारणपणे १ आदि शैव कालखंड २ वैदिक आणि लोकशैव कालखंड ३ ब्रह्म सांख्य कालखंड ४ ब्राह्मण आणि लोकशैव कालखंड ५ आगम कालखंड ज्यामध्ये लोकशैव व जैन आणि बौद्ध हे तीन येतात लोक शैव मध्ये भक्तीशैव , पाशुपतांच्यापासून नाथ संप्रदायापर्यंत अनेक जण येतात ६ लोकशैव आणि वैष्णव आणि वेदांत कालखंड
अशा सहा कालखंडांच्या मध्ये वाटचाल करतो
मुस्लिम आक्रमणानंतर भारताचा इतिहास बदलतो मध्ययुगीन होतो आणि आपणाला मुळातच अनेक लिखित पुरावे सुद्धा अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ स्वरूपात दिसतात मिळायला लागतात याचे श्रेय अर्थातच आपणाला मुस्लिम इतिहासकारांना द्यावे लागेल कारण तपशीलवार वृत्तांत जितके मुस्लिम इतिहासकारांनी लिहिले तसे तपशीलवार वृत्तांत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहिले गेले नव्हते अर्थातच अपवाद आहेत परंतु ते अपवादच आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे या अपवादांनाही अर्थातच जबाबदार शैव आहेत विशेषता कल्हण याचा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ यासंदर्भात फार महत्त्वाचा आहे
भारताचा प्राचीन इतिहास हा प्रामुख्याने मुसलमान पूर्व इतिहास आहे हे कबूल करावे लागते
हा इतिहास हा प्रामुख्याने लिखित आणि पुरातत्वीय प्रमाणाच्या आधारे निश्चित करण्याकडे कल असल्याने आणि शैव लोकांचा इतिहास हा प्रामुख्याने मौखिक असल्याने अनेकदा सर्वच विशेषता शैव इतिहासकाराची फार मोठी पंचाईत झालेली दिसते गमतीचा भाग असा की आफ्रिकेच्या इतिहासामध्ये मौखिकतेला जे स्थान मिळालेले आहे त्याचे कौतुक करणारे भारतीय विचारवंत लोक किंवा आदिवासी संस्कृतीतील मौखिकतेचे कौतुक करणारे लोक जेव्हा हीच मांडणी शैव धर्मासंदर्भात उदयाला यायला लागते तेव्हा नाकारायला लागतात म्हणजे ब्राह्मण धर्मी लोकांनी जर का वेद हे मौखिक होते आणि त्यांची जडणघडण इसवी सन पूर्व १५०० पासून सुरू होते असे मांडले तर तिथे मौखिक परंपरा मान्य केली जाते (प्रत्यक्षामध्ये वैदिक लोकांचा लिखित इतिहास इसवी सन 1000 पासून उपलब्ध होतो ) परंतु शैव लोकांचा इतिहास हा जर का अशाच मौखिक परंपरेमध्ये फार प्राचीनतेपर्यंत जात असेल तर तो नाकारला जातो या मधला विरोधाभास आणि दांभिकता उघड आहे
वास्तविक ब्राह्मण धर्मी लोकांनी आठव्या शतकापासून अत्यंत जाणीवपूर्वक शैव श्रुतीचा उल्लेख तंत्र श्रुती असा केलेला आढळतो अनेकदा तर वैदिक इतिहास मानणारे लोक सुद्धा तंत्रश्रूती ही आधीची श्रुती आहे आणि म्हणूनच तिला वैदिक श्रुती इतकेच महत्त्व आहे हे मान्य करतानाही अधून मधून दिसतात याचे कारण हळूहळू तंत्र हा शब्द व तंत्र हेच जास्त प्रचलित होत गेले आणि साहजिकच त्यामुळे बदनामी करता येणे सुद्धा अधिक सोपे होते बौद्ध आणि जैन या दोन धर्मांनी तर तंत्र स्वीकारले पण वैष्णव लोकांनी मात्र तंत्राचा प्रचंड मोठा स्वीकार केला कारण सामान्य माणसाशी निगडित असलेले हे तंत्र त्यांना आकर्षित करायला लागले आणि मुख्य म्हणजे शैव श्रुती मधील भक्ती त्यांना स्वीकारावी लागली कारण तिथे त्यांचा धार्मिक धंदा होता मुळातच सामान्य माणसे अनेकदा भावतंत्राने मार्गाने मोक्षाला पोहोचवतात किंवा मग त्यांना व्यवहारिक पातळीवर देवाकडून काही आवश्यक वाटते म्हणून भक्ती स्वीकारली जाते ती चायना आणि जपानच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपणाला आढळते आणि म्हणूनच आपल्याला अनेक बौद्ध मंदिरे तिथेही आढळतात भारत हा एकमेव देश कदाचित असा असेल की जिथे ज्ञान , शक्ती, शरीर ,क्रिया यांना सुद्धा मोक्ष किंवा ईश्वराच्या प्राप्ती संदर्भात महत्त्वाचे मानलेले गेलेले दिसते
प्रश्न असा आहे की मौखिकतेचा इतिहास म्हणून कितपत स्वीकार करावा आणि शैवांचा इतिहास कसा लिहावा म्हणजे पोतराजाने शंकराबद्दल म्हणताना वेदांच्या आधी तू होतास असे म्हटले (आपल्याकडे बाबुराव बागुलांनी माणसाबाबत असे म्हटलेले आहे की वेदांच्या आधी तू होतास आणि ती कविता फार गाजली होती पण अनेकांना हे माहीत नाही की पोतराजांचे हे मूळ शैव काव्य आहे आणि या पोतराजाच्या काव्याची मुख्य प्रेरणा शैव आहे आणि ते शिवाला उद्देशून आहे ) तर आपण मौखिक परंपरा प्रमाण मानून हे स्वीकारणार आहोत का की वेदांच्या आधी सुद्धा शिव होता ? वास्तविक जवळजवळ सर्वच समाजशास्त्रीय विचारवंत ऐतिहासिक विचारवंत ज्यात बाबासाहेब आंबेडकर पण येतात इरावती कर्वे पण येतात आडवाटेने शंकर हा वेदांच्या आधी आहे अनार्य आहे किंवा शंकर हा भारताचा मुख्य देव आहे हे कबूल करत असतात परंतु प्रत्यक्ष इतिहासाची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ही गोष्ट कशी स्वीकारायची हे समजत नसल्याने आणि लिखित पुरावे तर सापडत नसल्याने करायचे काय असा फार मोठा प्रश्न पडत असतो इंग्रजांच्या कालखंडामध्ये निदान पुरातत्वीय पुरावे शोधण्याची धडपड होती पण ही धडपड सुद्धा प्रामुख्याने बुद्ध केंद्री आणि जैन केंद्री होती साहजिकच भगवान शिवांना त्यांच्यामध्ये स्थान नव्हते पण निदान वैदिकतेच्या विरोधात ठाकलेल्या या दोन धर्मांना काहीतरी मान्यता मिळालेली दिसते. शैव श्रुती बाबत हे घडताना दिसलेले नाही स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये तर काँग्रेसने अत्यंत जाणीवपूर्वक शैवांच्या दिशेने होऊ घातलेली उत्खनने होऊच दिलेली नाहीत एकीकडे बहुजन समाजाचे नाव घ्यायचे पण बहुजनांचा असलेला धर्म मात्र स्वीकारायचा नाही हे काँग्रेसचे धोरण होते आणि या धोरणासाठीच अनेक झारीतले xxचार्य व्यवस्थित वाट अडवून नोकरशाहीत बसलेले होते खरे तर शुक्राचार्य हा शब्द सुद्धा मला वापरायचा नव्हता कारण शुक्राचार्य स्वतःच शैव होते
सर्वसाधारणपणे ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंदू धर्माऐवजी ब्राह्मण धर्म हा शब्द वापरला जात होता कारण या काळातले सर्व हिंदू ब्राम्हणांनाच आपले पुरोहित मानत होते असे ब्रिटिशांचे मत होते (प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये या काळात जणू काय सर्व काही ख्रिश्चन असल्याच्या थाटात चाललेले होते. प्रत्यक्षामध्ये युरोपमध्ये अनेक वेगळे संप्रदाय अस्तित्वात होते हे आता नवीन इतिहासांच्या मध्ये सिद्ध झालेले आहे)प्रत्यक्षामध्ये ते खरे नव्हते कारण अनेकदा या काळामध्ये गावांच्यामध्ये आणि अनेक शहरांच्या मध्ये सुद्धा गुरव किंवा तत्सम शैव पुरोहितच ज्यांना ब्रिटिश हिंदू म्हणतात त्यांचे पुरोहित म्हणून काम करत होते ब्रिटिशांनी ब्राह्मणांना दिलेला आश्रय हा त्यांना आंधळा बनवणारा ठरला त्यामुळे जनतेकडे थेट पाहण्याऐवजी ते ब्राह्मणांच्या चष्म्यातून पाहत होते यामुळे वसाहत वादाला कळत नकळत ब्राह्मणी वसाहत वादाचे किंवा वसाहतीक ब्राह्मणी वादाचे स्वरूप प्राप्त झाले भारतातल्या वसाहतवादाची चर्चा करताना आपणाला अनेकदा इतर देशांच्यातली मॉडेल्स बाजूला काढून ठेवावी लागतात हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या स्थानिक जमातींच्या मध्ये अनेकदा अशा काही जमाती दिसतात जिथे पुरोहित शाही प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉमिनेट आहे आपल्याकडेही अशीच काहीशी वस्तुस्थिती आहे आणि हे घडण्यामध्ये मुस्लिम राजवटीचा प्रचंड मोठा वाटा आहे प्रथम मुस्लिमच होते ज्यांनी केवळ किताबी धर्म आहे म्हणून ब्राह्मण धर्माला मान्यता दिली आणि ब्राह्मण ग्रंथाचा वेद हा लिखित धर्मग्रंथ किंवा किताबी धर्म ग्रंथ आहे या एका किताबी गृहीतकाला मान्यता देऊन ब्राह्मण धर्मालाच सर्व भारतीय धर्मांचे मेंदू मानले भारतीय इतिहासाचे सर्वाधिक नुकसान हे मुस्लिमांनी केलेले आहे त्यांचीच ही विरासत वारसा पुढे ब्रिटिशांनी चालवला गेली हजार वर्षे त्यामुळेच भारताचा इतिहास आणि त्याचे लेखन हे अत्यंत गुंतागुंतीचे बनत चाललेले दिसते इतकेच नव्हे तर स्वतःच्या इतिहासावर क्लेम करण्याची बुद्धी सुद्धा शैव लोक विसरून गेलेले दिसतात ज्या लोकांना स्वतःची परंपरा दिसत नाही इतिहास दिसत नाही ते आपले भविष्य नीट बघू शकत नाही शैव लोकांच्या बाबतीत हे जितके खरे आहे तितके ते इतर कोणातच कोणाबाबतच खरे नाही
भारताचा इतिहास हा प्रामुख्याने दोन वर्ण लिहीत असतात पहिला ब्राह्मण वर्ण इतिहास लिहीत असतो आणि दुसरा हा क्षत्रिय वर्ण लिहित असतो सिंधू संस्कृतीचे काय करायचे हे न कळल्याने अलीकडे हे दोन्ही लोक वेगवेगळ्या मार्गाने ही संस्कृती बळकावण्याच्या दिशेने प्रयत्न करतात बहुजन समाजाला xx नसते अशा प्रकारचे गृहीतक यामागे आहे बहुजन समाज काही निर्माणच करू शकत नाही असेही इन डायरेक्टली या लोकांना सांगायचे असते वास्तविक या देशांमध्ये जे काही निर्माण केलेले आहे ते बहुजन समाजाने निर्माण केलेले आहे किंवा बहुजन समाजातल्या नायकांनी निर्माण केलेले आहे आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांनी या नायकांना क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्ण देऊन केवळ भडकवण्याचे काम केलेले आहे जेणेकरून सर्व श्रेय आपल्या पदरात पडावे इंग्रजांच्यामुळे वैश्य लोक हे केंद्रस्थानी आले आणि त्यांनी थोडा इतिहास वेगळा लिहिला परंतु त्यांना सुद्धा स्वतःच्या वैश्य वर्णत्वातून मुक्ती मिळालेली दिसत नाही याचे कारण भारतीय वैश्य समाज हाच मुळात कधीही ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांच्या प्रभुत्वातून मोकळा झाला नाही बहुजन समाजातील बहुसंख्य लोकांनी नेहमीच या लोकांनी काही दावा केला की त्याला लगेच स्वीकारण्याची तत्परता दाखवलेली दिसते आणि आजही ते अशी तत्परता दाखवतात ही तत्परता अत्यंत हानिकारक ठरलेली दिसते आता हे स्पष्टपणे सांगायची वेळ आलेली आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण आणि वैश्य या वर्णांशी आमचा काडीचाही संबंध नाही आम्ही बहुजन आहोत आणि आम्हीच या देशाचे मालक आहोत यामध्ये प्रामुख्याने शैवपुरोहितांना मुख्य भूमिका निभावावी लागेल कारण जोपर्यंत पंडित किंवा गुरव हे स्वतःला स्वतंत्र आणि वर्णमुक्त करत नाहीत तोपर्यंत त्यांची शैव ही आयडेंटिटी प्रस्थापित होणे अशक्य आहे अनेकांना इतिहास लिहावासा वाटतो परंतु वैदिकतेपासून सुटका मात्र करून घ्यायची नसते याचा परिणाम असा झालाय की शैव मंदिरातून सांगितला जाणारा इतिहास हा प्रामुख्याने वैदिक इतिहासच असतो शैव इतिहास नसतो
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग ३ श्रीधर तिळवे नाईक
भारतातील भक्ती संप्रदाय हा फार प्राचीन भावतंत्राचा भाग आहे आणि तो प्रामुख्याने शैव तंत्राचा भाग आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धम्म ज्ञानतंत्रातले आहेत साहजिकच तिथे मूर्ती पूजेची शक्यताच निर्माण झालेली नव्हती असे असताना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये अनेकदा काही अति शहाणे इतिहासकार बुद्ध आणि महावीर यांच्यापासून शिवाची आणि विष्णूची मूर्ती निर्माण झाली असे भासवत असतात वास्तविक शैव-धर्मामध्ये भक्ती किंवा भावतंत्राचे जे तंत्र आहे त्यात शिवलिंगाची पूजा केली जात होती. पर्शियन आणि ग्रीक लोकांच्या आक्रमणानंतर मात्र आपल्याकडे ही मंदिरातील मूर्ती पूजा सुरू झाली त्यापूर्वी शैवधर्मी लोकांच्यात फक्त देव्हाऱ्यातच मूर्ती ठेवली जात होती
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवाची मूर्ती पूजा ही वेगळी गोष्ट आहे आणि शिवाची लिंग पूजा ही वेगळी गोष्ट आहे पण या गोष्टीतला फरक जाणीवपूर्वक समजून न घेता भावतंत्र किंवा भक्ती संप्रदाय हा जैन आणि बौद्ध धर्मातून निर्माण झालेला आहे अशा प्रकारची मांडणी काही लोक करत असतात त्यामुळे ही भारतीय कालगणना अधिक गुंतागुंतीची बनते वास्तविक यासंदर्भातले सत्य इतकेच आहे की युरेशियन लोकांनी शैवधर्म संस्कृतीकडून लोकांच्याकडून भक्ती स्वीकारली भाव स्वीकारला भाव तंत्र स्वीकारले आणि मूर्ती पूजा ही स्वीकारली मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे खुद्द जिवंत असताना सुद्धा गौतम बुद्धांनी कधीही आपली पूजा अलाव केली नाही किंबहुना स्वतःलाच प्रमाण मानाने हा त्यांचा उद्देश आहे उपदेशही आहे मग बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा कशी आली ?
बौद्ध धम्मातील आद्य असलेल्या गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशातून निर्माण झालेल्या ज्ञानतंत्राचा जसा जसा पराभव होत गेला त्याचा प्रभाव कमी होत गेला तसा तसा भावसंप्रदाय स्वीकारून गौतम बुद्धाची आणि महावीराची पूजा प्रस्थापित केली गेली जेणेकरून जैन आणि बौद्ध धम्मातले लोक धम्म सोडून जाऊ नयेत आजही आपण हे पाहू शकतो की इस्लामची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे याचे कारण बहुतांशी लोक अजूनही भावतंत्रामध्येच अडकलेले असतात मुख्य म्हणजे तिथे मोक्षाच्या ऐवजी अनेकदा नवस बोलणे मन्नत मागणे अशा प्रकारच्या श्रद्धांजन्य गोष्टी करता येतात ज्या इतर तंत्रांच्या मध्ये अशक्य आहे ज्ञानतंत्रामध्ये नवस बोलणे बसत नसल्याने पुढे पुढे बुद्धाला नवस बोलणे शक्य व्हावे म्हणून बुद्धाच्या मूर्ती निर्माण करण्यात आल्या धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे हे तत्कालीन बौद्ध धर्म गुरूंना वाटले आजही हे योग्य होते की नाही हे ठरवणे अवघड आहे त्यातूनच मग बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात
सगुण ईश्वर हा प्रत्येक माणसाला हवासा का वाटतो हा एक फार मोठा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला मोठा बिग ब्रदर किंवा बिग फादर आवश्यक वाटतो आणि त्यातूनच भावतंत्र हे प्रभावी बनत जाते मूळ भाव तंत्रामध्ये फक्त शिवलिंगाचीच पूजा अपेक्षित होती आणि आजही ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना फक्त शिवलिंग किंवा शक्ती लिंग यांचीच पूजा करण्याची अनुमती आहे पुढे या दोन्ही लिंगांचा समन्वय करून ईश्वरलिंग निर्माण करण्यात आले आणि आज भारतातल्या बहुतांशी शैव मंदिरामध्ये ईश्वर लिंगच आहे म्हणूनच या लिंगांची नावे ओंकारेश्वर त्रंबकेश्वर अशी असतात बाकीच्या सर्व पूजा यानंतर पंडित , गुरव आणि नंतर ब्राह्मणांनी आणलेल्या आहेत आणि त्या सर्व शैव पुरोहितांनी म्हणजेच गुरव किंवा सर्व पंडित शैवाचार्य यांनी स्वीकारलेल्या आहेत भारतात गणपतीची पूजा तर अत्यंत पद्धतशीरपणे आणली गेली आणि बाप से बेटा सवाई अशा तऱ्हेने फेर रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून शंकर ही देवता बाजूला व्हावी आणि गणपती हा देव अधिकाधिक बळकट व्हावा आता तर अवस्था अशी आहे की गणपती ही देवता ब्राह्मणांचीच देवता होऊन गेली आहे आणि यामध्ये पेशवाईचा वाटा प्रचंड होता कारण त्यांचे ते कुलदैवत होते आत्ताचा गणपती हा शैव कमी आणि हिंदु जास्त आहे त्याच्या निर्मिती कथेपासून सर्व काही बदलण्यात आलेले आहे आणि बरेचसे काल्पनिक आहे ही वस्तुस्थिती आहे पण ही काल्पनिकता हीच ब्राह्मण धर्माची सर्वात मोठी ताकद असते दंतकथा निर्माण करून इतिहास नष्ट करणे हा ब्राह्मणांचा सनातन धंदा आहे
भारतातील सर्वात प्राचीन कालगणना ही शैव कालगणना आहे आणि तिचे स्वरूप नेमके आजही स्पष्ट होत नाही भारताला मिळालेले पहिले नाव हे इंदू आहे आणि चिनी लोक याच अंगाने भारताचे नाव घेताना दिसतात दुसरे नाव अर्थातच मेरू पर्वत म्हणजेच सह्याद्री या अंगाने येते आणि त्यातूनच मेरूहाचे मेलूहा झालेले दिसते मेरू पर्वतापाशी राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून म्हणजे सह्याद्रीच्या आसपास राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून हे नाव आहे जे प्रामुख्याने दक्षिण भारतासाठी वापरले जात होते समुद्रमंथन करताना हिमालय पर्वताची कधीही रवी झालेली नाही कारण हिमालय समुद्रापासून प्रचंड दूर आहे पण मेरू पर्वत मात्र अनेकदा समुद्र ढवळताना दिसतो याचे कारण तो दक्षिण भारतात आहे आणि दक्षिण भारतीय लोक खरोखरच या काळामध्ये समुद्र ढवळून काढत होते आणि आफ्रिकेला पोहोचत होते आणि कदाचित अमेरिका या खंडा पाशी ही पोहोचत होते इंदू या शब्दाचा अर्थच चंद्र असा होतो आणि चंद्राप्रमाणे कालगणना करणारे ते इंदू अशी ही मूळ व्याख्या आहे या इंदूचाच अपभ्रंश होऊन पुढे हिंदू हा शब्द उदयाला आलेला आहे भारताचा इतिहास लिहिताना कायम उत्तर भारताच्या अंगाने लिखाण करणे ही उत्तर भारतीय लोकांची खोडी आहे ती आपण स्वीकारण्याची काही कारण नाही विशेषतः मराठी लोकांनी तरी भारतीय इतिहास कायम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे उत्तर भारतीय धर्म ज्यामध्ये वैष्णव जैन बौद्ध असे धर्म येतात ते जास्तीत जास्त दक्षिण भारतात मोठे करून दाखवणे ही उत्तर भारतीय लोकांची आणि इतिहासकारांची गरज आहे कारण त्यामुळे ते हल्ली दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात करत असलेल्या स्थलांतराला आधार मिळतो त्यामुळेच ते इतिहासाच्या नावाखाली त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी अनेक दंतकथा लिहित असतात त्या आपण स्वीकारण्याची गरज नाही
आठव्या शतकानंतर उत्तर भारतीय इतिहासाचा प्रभाव फारसा पडलेला दिसत नाही आणि म्हणूनच मग दक्षिणेतून शंकराचार्य उदयाला येताना दिसतात याचे कारण कळत नकळत उत्तर भारतामध्ये एक प्रकारचा अनागोंदी कारभार झालेला दिसतो त्या उलट 800 ते 1200 या कालखंडात ब्राह्मण धर्माला मदत करणारे जे काही घडले ते दक्षिण भारतात घडले असे दाखवले जाते आणि या काळामध्ये उत्तर भारतात नवनाथांचा विशेषता गोरखनाथांचा जो प्रभाव वाढत गेला शैव प्रभाव वाढत गेला त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढले जात नाही हिंदी भाषेची सुरुवात गोरखनाथांनी केली हे सुद्धा डावलले जाते
या काळात दक्षिण भारतात विशेषता केरळमध्ये वैष्णव धर्म वाढीला लागला आणि वैष्णव धर्म वाढीला लागला म्हणूनच वर्णव्यवस्था वाढीला लागली आणि वर्णव्यवस्था वाढीला लागली म्हणून तिथे हळूहळू वर्ण व्यवस्थेला शह देणारा धर्म म्हणून आचार्य शंकर यांच्या अवस्था दर्शनाचा आणि ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि आज केरळमध्ये 30 टक्के लोक ख्रिश्चन झालेले आहेत याला कारण इथला वैष्णव प्रभाव आणि त्या धर्माने आणलेली अत्यंत कडक वर्णव्यवस्था होय ब्राह्मण धर्माने दक्षिण भारतात बळकावलेला हा पहिला भूप्रदेश आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित तामिळनाडूमध्ये फूट पाडून तामिळनाडू मधून केरळ नावाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करून मल्याळम नावाची स्वतंत्र भाषा निर्माण करून प्रभाव निर्माण करत बळकावलेला आहे आज दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक महत्त्वाची वैष्णव मंदिरे ही केरळामध्ये आहेत हा योगायोग नाही तिथली मूळची सर्व मातृसत्ताक पद्धत कशी पद्धतशीरपणे ब्राह्मण धर्माने ताब्यात घेतली हा एक करूण इतिहास आहे वर्ण व्यवस्थेचे सर्वाधिक घृणास्पद रूप आपणाला उत्तर भारतात दिसण्याएवजी केरळमध्ये दिसते याहून दक्षिण भारताला लाज वाटणारी कुठली गोष्ट असू शकते ? साहजिकच या वर्णव्यवस्थेच्या विरोधात इथे कम्युनिस्ट पक्ष सुद्धा आपोआप वाढीला लागला कारण इथल्या बहुजन लोकांना कम्युनिजम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आज अवस्था अशी आहे की केरळ मधून असा एक सिद्धांत उदयाला येतो आहे की भक्ती संप्रदाय भारतामध्ये ख्रिश्चन लोकांनी सुरू केला हे असे का घडते याच्या मुळात सुद्धा जाण्याची गरज हिंदुत्ववादी लोकांना वाटत नाही कारण त्यांना इथे पुन्हा एकदा कशी वर्णव्यवस्था आणता येईल हेच पाहायचे आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रभावाचा सखोल मागोवा घेण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्ड घेऊन प्रश्नाला बगल देणे चाललेले आहे जर का खरोखर हिंदुत्ववादी लोकांना केरळमध्ये काही करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांनी केरळमध्ये वर्णव्यवस्थेवर प्रचंड अटॅक केला पाहिजे पण असे काही न करता सनातन धर्माचा घोष करत हिंदुत्ववादी धार्मिक कार्ड खेळत असतात त्यामागे पुन्हा एकदा ब्राह्मणी सत्ता आणायची अशी इच्छा आहे की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे या सगळ्याची जर का बीजे आपण शोधायला गेलो तर ती आठव्या शतकापासून 12 व्या शतकापर्यंत पसरलेल्या केरळच्या इतिहासात आहेत आणि याच कालखंडामध्ये आद्य शंकराचार्य नावाची व्यक्ती होऊन गेली किंवा निर्माण केली गेली हा योगायोग नाही आचार्य शंकर होऊन गेले याबद्दल माझ्या मनात शंका नाही परंतु त्यांनी सांगितलेला पंचायतन उपदेश हा शैव होता हा उपदेश आणि आद्य शंकराचार्यांच्या सहाय्याने सांगण्यात येणारा ब्राह्मणधर्मी उपदेश याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे किंबहुना केरळ मधील सर्व शैव व्यवस्था ताब्यात घेण्याचे जे काही प्रयत्न झाले त्यातला हा आद्य प्रयत्न होय तो यशस्वी झाला आणि केरळची वाट लागत गेली तिथली वर्णव्यवस्था अधिकाधिक बळकट होत गेली
या कालखंडाबाबत नेहमीच इतिहासकार एक प्रश्न विचारत असतात तो म्हणजे या कालखंडामध्ये नेमके पुरातत्वीय पुराव्याचे काय होते ? आपण या कालखंडाकडे जर पाहिले तर हा कालखंड भावतंत्राच्या प्रचंड प्रभावाचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे इथले पुरातत्वीय पुरावे हे प्रामुख्याने मंदिरांच्यावर कोरले गेलेले शिलालेख किंवा इतर लेख आहेत त्यामुळे जमिनीत पुरावे शोधण्याऐवजी जमिनीवर उभा करण्यात आलेल्या मंदिरामध्ये पुरावे शोधणे योग्य होय या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी मंदिर शास्त्र हे अधिक उपयुक्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये लिहिले गेलेले धार्मिक वाङ्मय व धार्मिक शिलालेख दान शिलालेख राजकीय शिलालेख आपण नीट तपासले पाहिजेत कारण त्यामध्येच या कालखंडाचा खरा इतिहास लपलेला आहे 12 व्या शतकानंतर मात्र मुस्लिम इतिहासकारांनी अनेक गोष्टी तपशीलवार लिहिणे सुरू केले आणि त्याचा प्रभाव पडून भारतात सुद्धा अशा प्रकारचे वृत्तांत लेखन सर्व राजदरबारी सुरू झाले असे दिसते या लेखनामध्ये दंतकथांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना भारतातल्या अनेक दंतकथा ह्या मुळात या कालखंडात निर्माण झालेल्या आहेत राज दरबारी असलेले इतिहासकार आपल्या राजाची अनेकदा देवासारखी स्तुती करत असतात त्याचा प्रचंड प्रभाव इस्लामिक इतिहासकारांच्या वर आहे आणि भारतीय दरबारी इतिहासकारांच्यावरही होता आणि आहे आणि त्यांनीच या कालखंडाचा इतिहास राज्यव्यवस्थेत आणि राजाच्या स्तुतीत बुडवत बुडवत धुसर केलेला दिसतो या कालखंडामध्ये पुरातत्व शास्त्र आपणाला जास्त मदत करत नाही त्याऐवजी लेखनशास्त्र ज्याला आज काल ग्रॅमॅटोलॉजी असे म्हटले जाते आणि मंदिर शास्त्र असे म्हटले जाते तेच जास्त उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आपल्याकडचे काही इतिहासकार आजकाल 800 ते 1200 या कालखंडामध्ये पुरातत्वीय पुरावे नाहीत म्हणून खूपच शोक करत असतात म्हणून हे सांगावे लागते
महाकाव्ये आणि पुराणे बलवान होण्याचा हा कालखंड आहे याचे कारण मंदिरांची सातत्याने होत गेलेली निर्मिती ! शैव मंदिर हे फक्त कधीच भक्तांसाठी नव्हते तर त्यामध्ये अनेक सिद्ध आणि साधना करणारे साधक व दरम्यानचे साधू हे सुद्धा मुक्काम ठोकत असत हे आपण लक्षात घेतले पाहिजे अगदी जैन मंदिरे सुद्धा शैव मंदिरांनाच फॉलो करत होती जैनांच्यात सुद्धा सिद्ध साधू आणि साधक ही व्यवस्था आपणाला दिसते आणि त्यांच्या मूलमंत्रामध्ये हे स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या सर्व मंदिरांच्या मध्ये तपस्या करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड जागा होती विशेषता जी मंदिरे डोंगरामध्ये वसत तिथे तर अनेक साधू तपस्या करताना आजही दिसतात शैव मंदिरांच्या मध्ये शरीर ,ज्ञान,भाव , क्रिया आणि शक्ती अशी पंचतंत्रे कार्यान्वित असत आणि ती तशीच असली पाहिजे अनेक मंदिरांना याचा हल्ली विसर पडलेला आहे निदान पक्षी शैव मंदिरांच्या मध्ये तरी ही सर्वच्या सर्व पंचतंत्रे आपण इंट्रोड्यूस केली पाहिजेत अन्यथा पुन्हा एकदा फक्त भक्तीचा सुळसुळाट सुरू राहील आणि ते भारताच्या विकासाला परवडणारे नाही भारतातली सर्वात प्राचीन मंदिरे ही सुद्धा शैव मंदिरे आहेत आणि पुढे त्यांना शह देण्यासाठी म्हणूनच वैष्णव मंदिरे उभी करण्यात आली किंवा मग शैव मंदिरे राजवटींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन त्याच्यात वैष्णव देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अगदी अलीकडे सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पद्धतशीरपणे महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे किंबहुना अंबाबाईच्या जागी कशी महालक्ष्मी येते हे पाहिले की वैष्णव धर्मीय लोक 800 ते 1200 या कालखंडात आपले राजकारण कसे खेळत असतात ते स्पष्टपणे कळू शकते या कालखंडातले बहुतांश शिलालेख आणि अनेक सोकार्ड पौराणिक लेखन हे काल्पनिक असल्याचा संशय सर्वच इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे अनेक काल्पनिक पुराणे अत्यंत जाणीवपूर्वक देवळांशी जोडली जाऊन किंवा स्थलस्थळ पुराणे निर्माण करून त्या देवळांचा इतिहास पूर्णपणे बळकावण्याचा प्रकार आपल्याकडे घडलेला दिसतो अलीकडे तर बाळूमामासारखा शैव बहुदा लिंगायत संत वैष्णव करण्यात आलेला दिसतो हे सर्व ब्राह्मण धर्मीय लोक कसे पद्धतशीरपणे खेळी खेळत असतात त्याचे नमुने आहेत तरीसुद्धा बहुजन समाजाला काही xxx येते असे दिसत नाही 800 ते 1200 या कालखंडामध्ये हेच घडलेले आहे यामध्ये आपले विठ्ठल मंदिर सुद्धा येते जे मूळचे शैव होते पण नंतर वैष्णव करण्यात आले आणि तिथले मूळचे महादेव कोळी पुजारी हटवून त्या जागी वेगळे पुजारी आणले गेले जे विठ्ठलाला वैष्णव अवतार मानतात. जेव्हा दहाव्या शतकानंतर विष्णू सारख्या वैदिक देवतेला बहुजन समाजाकडून मान्यता मिळतच नाही हे लक्षात आले तेव्हा मग अत्यंत पद्धतशीरपणे राम आणि कृष्ण यांचे महत्त्व ब्राह्मण लोकांनी वाढवणे सुरू केले ते आजही वाढवणे सुरू आहे या कालखंडामध्ये सुद्धा जी कालगणना पद्धत अस्तित्वात आली ती अशीच स्थानिक राज्यकर्त्यांच्या कडून निर्माण झालेली दिसते
भारतातल्या सर्वात प्राचीन कालगणना या ऋषीमुनींची निगडित करणे ही ब्राह्मणांची गरज होती साहजिकच सप्तर्षीची कल्पना अत्यंत पद्धतशीरपणे वाढवण्यात येऊन सप्तर्षी कालगणना आणण्यात आली त्यासाठी अनेकदा शैव-धर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ केलेली दिसते म्हणजे शंकराला सर्वात प्रथम मोक्ष मिळाला हे मान्य करायचे मात्र त्याचे सर्वात पहिले सात शिष्य कोण तर हे सात ऋषी होते अशी मांडणी करायची प्रत्यक्षामध्ये हे सात ऋषी नव्हते तर ते सात शिष्य होते आणि त्यांची नावे वेगळी आहेत अपवाद फक्त अगस्ती असेल या सात शिष्यांना बळकावून त्यांना सप्तर्षी अशी संज्ञा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नावाने मग कालगणना सुरू झालेली दिसते इथे मूळ आद्यशैव कालगणना बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे
पुढे मग जेव्हा समाजात अनागोंदी कारभार वाढत गेला तेव्हा त्याचे समर्थन करण्यासाठी महाभारताच्या कालखंडामध्ये म्हणजेच सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1000 या कालखंडामध्ये चार युगांची संकल्पना विकसित करण्यात आली आणि त्यातूनच आज-काल कलियुग कालखंड सुरू झालेला दिसतो
पुढे मात्र क्षत्रियांनी कालगणना ताब्यात घेतलेली दिसते त्यातूनच मग वेगवेगळ्या राजांच्या कालगणना , वेगवेगळ्या राज्यांच्या कालगणना सुरू झालेल्या आहेत भारत हा एकसंध राष्ट्र नव्हता त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या राज्यांच्या राजांनी आपल्या नावे कालगणना सुरू केल्या याचे आश्चर्य नाही म्हणजेच सर्वसाधारणपणे भारतामध्ये आपणाला असे दिसते की एक आद्यशैव कालगणना आहे त्यानंतर ब्राह्मणधर्मी ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या दोन ब्राह्मणी कालगणना आहेत आणि मग क्षत्रिय लोकांनी आपल्या नावे निर्माण केलेल्या क्षत्रिय कालगणना आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सातवाहन लोकांनी सुरू केलेली शक कालगणना शके दिसते तिच्याबद्दलचा वादविवाद अजूनही संपलेला नाही ह्या इतक्या सगळ्या चाळीसच्या आसपास असलेल्या कालगणना घेऊन आपण नेमके काय करू शकतो ? त्यामुळेच एक तर आपण इसवी सन पूर्व 20000 पासून कालगणना सुरू करावी हे उत्तम त्यामध्ये भारतातल्या सर्व प्राचीन पुरातत्वीय उत्खननांना न्याय देता येतो आणि शैव लोकांना स्वतःची कालगणना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी मिळते सर्वसाधारणपणे वीस हजार वर्षांपूर्वी भगवान शंकर (आदिवासी साहित्य प्रमाण मानल्यास आपणाला शंभू असे नाव द्यावे लागेल शिव हे तत्व आहे शंभू हा होऊन गेलेला पुरुष आहे) यांचा मृत्यू किंवा जन्म इथून ही कालगणना सुरु होते म्हणजे आपणाला इसवी सन 2000 असे न म्हणता इसवी सन 22000 असे म्हणावे लागेल आपल्या लोकांना हे कितपत झेपेल याविषयी मला शंका आहे पण आपले प्राचीनत्व सिद्ध करण्याची आणि ते व्यवहारात वागवण्याची कालगणना हीच एक संधी असते आपणाला अजूनही ही गोष्ट कळलेली नाही वैदिक लोकांच्या प्रचंड ब्राह्मक कालगणना आपल्या कामाच्या नाहीत कारण त्या बनावट वाटायला लागतात उत्खननशास्त्रामध्ये भारतामध्ये विशेषता दक्षिण भारतामध्ये जेव्हा उत्खनन होईल तेव्हा आपणाला इसवी सन पूर्व दहा हजार पर्यंत तरी किमान जावे लागेल असा माझा अंदाज आहे कदाचित त्या आधीचे ही उत्खनन शास्त्रीय पुरावे सापडू शकतात त्यांना जागा असावी म्हणून इसवी सन पूर्व 20000 ही काल गणना स्वीकारलेली आहे भगवान शंभू हे प्रामुख्याने पशुपालक कालखंडात जन्मलेले आहेत हे अत्यंत निर्विवाद आहे आणि पशुपालन हे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे म्हणूनच इतकी प्राचीन सुरुवात करावी लागते
या कालगणने विरोधात लढणे आपणाला शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर मग ब्राह्मण लोकांनी वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबलेली दिसते वेदांचा कालखंड आजकाल लाखो वर्षांपूर्वी नेण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आत्ताचाच नाही तर पौराणिक महाकाव्यीक काळापासून चाललेला उद्योग आहे आणि यामागे उद्देश एकच आहे तो म्हणजे शैव कालगणनेला शह देणे बौद्ध आणि जैन कालगणनेला शह देणे प्रत्यक्षात हे साधलेले दिसत नाही याचे कारण वैदिक संशोधनामध्ये युरोपियन लोकांनी घेतलेला इंटरेस्ट ! युरोपियन संशोधक काही केल्या वेदांचा कालखंड हे इसवी सन पूर्व पंधराशे च्या पूर्वी घेऊन जात नाहीत त्यामुळेच अलीकडे युरोपियन लोकांच्या इतिहासाबद्दल शंका निर्माण करणे सुरू झालेले आहे
थोडक्यात काय जैन आणि बौद्ध धर्माला शह देता यावे म्हणून आणि शैव लोकांचा प्रभाव कमी करावा म्हणून 800 ते 1200 या कालखंडात रामायण आणि महाभारत यांचा दबदबा आणि गवगवा वाढवण्यात आला राम आणि कृष्ण यांची मंदिरे उभी करण्यात आली आज सर्वांनाच माहिती आहे की इसवी सन सातव्या शतकापूर्वी आपणाला एकही राम मंदिर किंवा एकही कृष्ण मंदिर दिसत नाही कारण रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतून उदयाला आलेल्या या देवता आहेत आणि भारतीयांनी जेव्हापासून या महाकाव्यिक देवतांचा स्वीकार केला तेव्हापासून त्यांचे पतन सुरू आहे ते अजूनही थांबलेले नाही जगात सर्वत्रच महाकाव्य लिहिली गेली तशी ती भारतातही लिहिली गेली परंतु जगातल्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या महाकाव्यातून निर्माण झालेल्या देवता नंतर सोडून दिल्या भारतात मात्र अशा प्रकारचा त्याग करता आला नाही किंबहुना भारतातल्या ब्राह्मण पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा त्याग होणार नाही याची काळजी घेतली याचे कारण एकच ते म्हणजे पौराहीत्य व्यवसाय आणि वर्ण व्यवस्थेला या रामायण आणि महाभारतातून मिळणारा सपोर्ट !
रामायण आणि महाभारतामुळे आठव्या शतकापासून वैष्णव धर्म प्रभावी होत गेला मात्र त्याला शैव-धर्मावर शेवटपर्यंत मात करता आली नाही आणि म्हणूनच मग भावतंत्र भक्ती संप्रदाय स्वीकारून हिंदू धर्माची निर्मिती अत्यंत पद्धतशीरपणे करून विष्णू आणि शिव या दोघांना सन्मान देणे सुरू झाले भारतात भक्ती संप्रदायाच्या अंगाने जर का आपण हिंदू या शब्दाची व्याख्या करायची ठरवले तर शिव शक्ती विष्णू लक्ष्मी गणपती आणि स्कंद या सा देवतांची पूजा किंवा त्यांच्या अवतारांची किंवा रुपांची पूजा करणारे लोक अशी करता येते भारतात ब्रह्मदेवाची पूजा आजही केली जात नाही कारण ब्राह्मणांनी त्याची हकालपट्टी केली कारण ब्राह्मणांच्या क्रिएशन सिद्धांतामध्ये ब्रह्मदेव जे काही करतो आहे ते स्वीकारणे इस्लामिक कालखंडामध्ये अशक्य बनत गेले ब्रह्मदेव आपल्या मुलीच्या मागे लागल्याने आणि तिच्यापासून संतती झाल्याने त्याच्यावर बंदी घालणे हे ब्राह्मणांसाठी आवश्यक झाले
आज आपण जर का दैनंदिन व्यवहारात हिंदू काय करतो हे पाहिले तर तो या सहा लोकांची सहा देवतांची त्यांच्या विविध रूपांची आणि अवतारांची पूजा करतो असे आपणाला म्हणता येते हे करताना पद्धतशीरपणे शिव आणि शक्ती यांचे सामर्थ्य कसे कमी करता येईल हे पाहिले जाते अलीकडे तर महालक्ष्मीलाच शक्ती म्हणण्याची आणि तशी प्रथा रूढ करण्याची चाल निघालेली आहे ब्राह्मणांचा उद्देश साफ आहे सर्वात प्रथम शैव धर्मी लोकांना बहुजनांना गोंजारायचे आणि हळूहळू सर्व शैव धर्म नष्ट करून टाकायचा असा हा प्लॅन आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजाला यातल्या काहीही गोष्टी कळत नाहीत तो हे सर्व होऊ देत आहे त्यासाठी मग अनेक कथा वापरल्या जातात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद काश्मीरमध्ये गेले तर तिथे कालीच्या मंदिराची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले तर स्वप्नात किंवा दृष्टांतात येऊन त्यांना काली म्हणाली की माझी काळजी तू करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आता ही कथा वारंवार सांगितली जाते कारण शैव लोकांनी कालीच्या रक्षणासाठी काहीच करू नये काली स्वतः स्वतःचे रक्षण करायला समर्थ आहे असे म्हटले की कालिचे स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी शैव लोकांच्यावर येत नाही ही मुद्दाम ठेवलेली पळवाट असते जेणेकरून शैवाने काही कृतीच करू नये हे अत्यंत पद्धतशीरपणे केले जाते त्यातच स्वामी विवेकानंद यांचे नाव असल्याने आणि हे कथन बहुदा सत्य असल्याने त्याचा प्रभाव ताबडतोब पडतो जर काली इतकी समर्थ होती, तर मग काश्मीरमध्ये सगळे मुसलमान झालेच नसते की कालीमातेनेच सर्व शैव लोकांना मुसलमान होऊ दिले ? शैव लोकांनी आता स्वतःची जरा बुद्धी वापरणे फार आवश्यक आहे आणि स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या नीतिमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे श्रद्धा किती ताणायची याचा पोच बाळगावा लागतो सर्व काही देव बघून घेईल या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही कारण जीव हाच शिव असतो आणि शिव हे आपणच या जगामध्ये जगताना अमलात आणायचे असते मुळात सर्व देवता या माणसाने त्या अमूर्त शून्यापाशी जाण्याकरता निर्माण केलेल्या असतात मोक्षासाठी निर्माण केलेल्या असतात किंवा निसर्गापुढे झुकून निर्माण केलेल्या असतात त्या संकल्पना असतात त्यामुळेच त्या संकल्पना काय आहेत त्या कशा विकसित होत गेल्या यांचा अत्यंत जमिनीवर राहून अभ्यास करावा लागतो शिव,शक्ती, संसार किंवा पसारा , ईश्वर आणि मोक्ष हे आदिपंचायतन सत्य आहे परंतु ते तुमचा इतिहास घडवतं या भ्रमात राहू नका ते इतकं अफाट आहे की पृथ्वी ही त्यांच्या संदर्भात नगण्य आहे इतिहास माणसाला माणसाचा घडवावा लागतो सध्या शैव धर्म दोन बाजूंनी संकटात आहे पहिले संकट भारत देशापुरते ब्राह्मण धर्माचे आहे तर दुसरे संकट जगामध्ये आणि भारतामध्ये इस्लाम धर्माचे आहे आणि एकाच वेळी या दोन्ही संकटांचा मुकाबला करावा लागणे अटळ आहे अशा वेळी नेमके काय पाऊल टाकायचे हे ठरवायचे असेल तर बसवेश्वर ,शिवाजी महाराज, संभाजी महाराज , पहिला बाजीराव , यशवंतराव होळकर , महात्मा फुले यांच्या इतके उपयुक्त मार्गदर्शन कोणीही करू शकत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा