कम्युनिस्ट शैवविरोधी का आहेत ? श्रीधर तिळवे नाईक
भारतात सर्वात पुरोगामी म्हणून समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक मिरवत असतात म्हणून आता ह्या लोकांच्या शैव समाजाविषयीच्या धारणा काय आहेत मुळात धारणा आहेत का हे तपासण्याची वेळ आली आहे
मार्क्सच्या भारताविषयीच्या लेखनात शैव हा शब्द एकदाही आलेला नाही आपण हे समजू शकतो कारण मार्क्स युरोपियन लेखनातून भारत समजून घेत होता
कम्म्युनिझमविषयी पहिला संबंध हा लेनिनमुळे आला आणि लेनिनच्या कार्याविषयी व क्रांतीविषयी आदर दाखवणारे दोन्ही नेते हे चक्क हिंदुत्ववादी होते लोकमान्य टिळक आणि बिपीनचंद्र पाल ह्यामागचे कारण उघड आहे जहालांना हिंसक क्रांतीचे वावडे न्हवते जे मवाळांना होते गदर पार्टीचे लाला हरदयाळ हेही जहालांशी जोडले गेले होते गमतीचा भाग म्हणजे खिलाफत चळवळीतील काही मुस्लिम सोविएत रशियाकडून ब्रिटिशविरोधी मदत मिळेल म्हणून रशियात गेले होते कारण लेनिनने भांडवलशाही साम्राज्यशाहीत रूपांतरित होते असे सिद्धांतन केले होते हे बघण्याजोगं आहे कि मुस्लिम राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नाही तर खलिफ़त स्टेटच्या रक्षणासाठी रशियाला गेले आणि इकडे ब्रिटिश सरकारने कम्म्युनिझम हा मुस्लिमविरोधी असल्याचा फतवा काढून त्यांना कॉर्नर केले (त्यावेळीही फतवे असे राजकारणाचे भाग होते ) १९२० साली ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस स्थापन झाली मात्र ती कुठल्याच राजकीय पक्षाने स्थापन केली न्हवती गांधींचा राजकीय प्रभाव थांबवण्यासाठी १९२१ साली श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी एक गांधी व्हर्सेस लेनिन नावाची पुस्तिका काढली ह्या पुस्तिकेचा एक दुष्परिणाम असा झाला कि भारतीय प्रोलिट्रीयत वर्गाचे गांधी हेच प्रतिनिधी आहेत हे शिक्कमोर्तब झाले आणि त्यांचा मार्ग योग्य नसल्याने लेनिनकडे वळा असे सांगण्यात आले कोण कुठला रशियात बसलेला लेनिन त्याला इथल्या भारतीयांनी आदर्श का मानावा ? पण परकीय नेत्यांच्याकडे तोंड करून बसण्याची कम्युनिस्टांची सवय ह्या पुस्तकांपासून सुरु झाली आणि कम्म्युनिझमचे विरोधक म्हणून हिंदुइझम व हिंदू हेही स्थिर झाले साहजिकच हिंदू धर्म हा कसा प्रोलिटरीयत वर्गाच्या हितसंबंधाच्या विरोधी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कम्युनिस्टांच्यावर आहे असा गैरसमज पसरला आणि कम्युनिस्ट हिंदूंना हाणत सुटले हा देश धर्म स्थापन करणारा देश आहे ही गोष्टच विसरली गेली सर्वात वाईट म्हणजे गांधींच्यात ट्रॅप झाल्याने ह्या देशातील प्रोलिटरीयट वर्गाचा धर्म हिंदू आहे अशी गैरसमजूत कम्म्युनिस्टांनी करून घेतली हा आंधळेपणा होता प्रत्यक्षात प्रोलिटरीएट वर्गाचा धर्म शैव होता आणि कम्युनिस्टांना हे अजूनही कळलेलं नाही
१९२० ला सीपीआयची स्थापना ताश्कंदमध्ये झाली कारण ब्रिटिशांनी कम्युनिस्टांना भारतात घातलेली बंदी ! स्वामी विवेकानंद आणि अरबिंदो घोष ह्यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीमुळे बंगाल्यांनी (मानवेंद्रनाथ रॉय त्यांची पत्नी एल्विन रॉय अबानी मुखर्जी व त्यांची पत्नी ह्यांनी ) हा पक्ष स्थापन केला हे सर्व बंगाली शाक्त ब्राम्हण होते तरीही ह्यांना शाक्त दर्शनावर लिहावेसे वाटले नाही किंवा आपला धर्म काय आहे हे तपासवासा वाटला नाही
सुरवातीपासूनच कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापन कार्यात मुस्लिमांचा वाटा महत्वाचा होता कारण त्यांना सुरवातीला खलिफत साठी कम्युनिझम सोयीचा वाटत होता आणि रशिया त्यासाठी मदत करेल अशी आशा होती
२५ डिसेम्बर १९२५ ला झालेल्या साम्यवादी अधिवेशनात स्वतःला सत्यभक्त म्हणवणाऱ्याने कम्म्युनिझमच्या रशियाकरणाविरुद्ध आवाज उठवून कम्युनिझमचे भारतीयकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले इतके कम्म्युनिस्ट ह्या काळात रशियन झाले होते अर्थात त्याला प्रतिसाद मिळाला नाही
आता रशियात डुबक्या घेणाऱ्या कम्युनिस्टांना जिथे तत्कालीन आवाज करणाऱ्या हिंदू धर्माकडे नीट पाहायला फुरसद न्हवती तिथे ते आवाजच न उरलेल्या शैवांच्याकडे काय बघणार ?
कम्युनिस्टांचा नालायकपणा हाही नाही . नालायकपणा हा आहे कि भारतीय तत्वज्ञानाची चिकित्सा करताना सगळे कम्युनिस्ट फक्त आर्य दर्शनांचाच विचार करतात तुम्हाला अनार्य दर्शने दिसत नाहीत ? हा काय भुक्कडपणा आहे ? हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी आर्यांच्या दर्शनाचा विचार करतात हे मी समजू शकतो कारण हे मुळात एलिट लोकांचे पक्ष आहेत पण तुम्ही श्रमिकांचे कैवारी म्हणवता आदिवासींचे कैवारी म्हणवता आणि तुम्हाला त्यांनी मांडलेली शैव दर्शने साध्या चिकित्सेसाठी घेता येत नाहीत ?कि श्रमिकांना विचार करता येत न्हवता हा भुक्कड पाश्चात्य विचाराने तुम्ही इतके आंधळे झाला कि तुम्हाला इथल्याच श्रमिकांची दर्शने दिसायची बंद झाली ?
आर्य संस्कृती आणि शैव संस्कृती ह्यांच्यातील वाद हा शोषक ऐदी संस्कृती आणि शोषित शूद्र ठरवल्य्या गेलेल्या संस्कृतीतील वाद आहे शूद्र दर्जा हा कायमस्वरूपी स्वस्त कामगार मिळावा म्हणून केलेली योजना असते म्हणूनच शैव सतत वैष्णवीझमबद्दल बोंबा मारत असतात श्रीकृष्ण हा नामधारी क्षत्रिय असतो आणि तो प्रत्यक्षात सैनिकांना फळांची अपेक्षा न करता लढाईत मर असा उपदेश करत असतो हातात शस्त्र न घेणाऱ्या ब्राम्हणांचा तो प्रतिनिधी असतो तो बिनदिक्कत वैश्य शूद्र ह्यांना पाप योनी म्हणत असतो म्हणून त्याच्याविरुद्ध उभे ठाकावे लागते
आपला कामगार वर्ग नेमका कुठला धर्म पाळतो का पाळतो ह्याची चिकित्सासुद्धा तुम्हाला करावीशी वाटत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या आर्य संस्कृतीत डुबक्या घेत आहात असा होतो कामगारवर्ग फक्त गणपती आणि शिवजयंती ह्यांच्याच जयंतीला आणि महाशिवरात्र व कुंभमेळ्याला एव्हढ्या मोठ्या प्रमाणात का जमतो ह्याची काही चिकित्सा कराल कि नाही ?
असो कम्युनिझमशिवाय शैवांचे घोडे पूर्वीही कधी अडले न्हवते आम्ही काही श्रमसंस्कृती मार्क्सकडुन शिकलेलो नाही आमच्यात ती शिव आणि बस्वेश्वरांकडून आलेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
भारतात सर्वात पुरोगामी म्हणून समाजवादी आणि कम्युनिस्ट लोक मिरवत असतात म्हणून आता ह्या लोकांच्या शैव समाजाविषयीच्या धारणा काय आहेत मुळात धारणा आहेत का हे तपासण्याची वेळ आली आहे
मार्क्सच्या भारताविषयीच्या लेखनात शैव हा शब्द एकदाही आलेला नाही आपण हे समजू शकतो कारण मार्क्स युरोपियन लेखनातून भारत समजून घेत होता
कम्म्युनिझमविषयी पहिला संबंध हा लेनिनमुळे आला आणि लेनिनच्या कार्याविषयी व क्रांतीविषयी आदर दाखवणारे दोन्ही नेते हे चक्क हिंदुत्ववादी होते लोकमान्य टिळक आणि बिपीनचंद्र पाल ह्यामागचे कारण उघड आहे जहालांना हिंसक क्रांतीचे वावडे न्हवते जे मवाळांना होते गदर पार्टीचे लाला हरदयाळ हेही जहालांशी जोडले गेले होते गमतीचा भाग म्हणजे खिलाफत चळवळीतील काही मुस्लिम सोविएत रशियाकडून ब्रिटिशविरोधी मदत मिळेल म्हणून रशियात गेले होते कारण लेनिनने भांडवलशाही साम्राज्यशाहीत रूपांतरित होते असे सिद्धांतन केले होते हे बघण्याजोगं आहे कि मुस्लिम राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नाही तर खलिफ़त स्टेटच्या रक्षणासाठी रशियाला गेले आणि इकडे ब्रिटिश सरकारने कम्म्युनिझम हा मुस्लिमविरोधी असल्याचा फतवा काढून त्यांना कॉर्नर केले (त्यावेळीही फतवे असे राजकारणाचे भाग होते ) १९२० साली ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस स्थापन झाली मात्र ती कुठल्याच राजकीय पक्षाने स्थापन केली न्हवती गांधींचा राजकीय प्रभाव थांबवण्यासाठी १९२१ साली श्रीपाद अमृत डांगे ह्यांनी एक गांधी व्हर्सेस लेनिन नावाची पुस्तिका काढली ह्या पुस्तिकेचा एक दुष्परिणाम असा झाला कि भारतीय प्रोलिट्रीयत वर्गाचे गांधी हेच प्रतिनिधी आहेत हे शिक्कमोर्तब झाले आणि त्यांचा मार्ग योग्य नसल्याने लेनिनकडे वळा असे सांगण्यात आले कोण कुठला रशियात बसलेला लेनिन त्याला इथल्या भारतीयांनी आदर्श का मानावा ? पण परकीय नेत्यांच्याकडे तोंड करून बसण्याची कम्युनिस्टांची सवय ह्या पुस्तकांपासून सुरु झाली आणि कम्म्युनिझमचे विरोधक म्हणून हिंदुइझम व हिंदू हेही स्थिर झाले साहजिकच हिंदू धर्म हा कसा प्रोलिटरीयत वर्गाच्या हितसंबंधाच्या विरोधी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कम्युनिस्टांच्यावर आहे असा गैरसमज पसरला आणि कम्युनिस्ट हिंदूंना हाणत सुटले हा देश धर्म स्थापन करणारा देश आहे ही गोष्टच विसरली गेली सर्वात वाईट म्हणजे गांधींच्यात ट्रॅप झाल्याने ह्या देशातील प्रोलिटरीयट वर्गाचा धर्म हिंदू आहे अशी गैरसमजूत कम्म्युनिस्टांनी करून घेतली हा आंधळेपणा होता प्रत्यक्षात प्रोलिटरीएट वर्गाचा धर्म शैव होता आणि कम्युनिस्टांना हे अजूनही कळलेलं नाही
१९२० ला सीपीआयची स्थापना ताश्कंदमध्ये झाली कारण ब्रिटिशांनी कम्युनिस्टांना भारतात घातलेली बंदी ! स्वामी विवेकानंद आणि अरबिंदो घोष ह्यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीमुळे बंगाल्यांनी (मानवेंद्रनाथ रॉय त्यांची पत्नी एल्विन रॉय अबानी मुखर्जी व त्यांची पत्नी ह्यांनी ) हा पक्ष स्थापन केला हे सर्व बंगाली शाक्त ब्राम्हण होते तरीही ह्यांना शाक्त दर्शनावर लिहावेसे वाटले नाही किंवा आपला धर्म काय आहे हे तपासवासा वाटला नाही
सुरवातीपासूनच कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापन कार्यात मुस्लिमांचा वाटा महत्वाचा होता कारण त्यांना सुरवातीला खलिफत साठी कम्युनिझम सोयीचा वाटत होता आणि रशिया त्यासाठी मदत करेल अशी आशा होती
२५ डिसेम्बर १९२५ ला झालेल्या साम्यवादी अधिवेशनात स्वतःला सत्यभक्त म्हणवणाऱ्याने कम्म्युनिझमच्या रशियाकरणाविरुद्ध आवाज उठवून कम्युनिझमचे भारतीयकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले इतके कम्म्युनिस्ट ह्या काळात रशियन झाले होते अर्थात त्याला प्रतिसाद मिळाला नाही
आता रशियात डुबक्या घेणाऱ्या कम्युनिस्टांना जिथे तत्कालीन आवाज करणाऱ्या हिंदू धर्माकडे नीट पाहायला फुरसद न्हवती तिथे ते आवाजच न उरलेल्या शैवांच्याकडे काय बघणार ?
कम्युनिस्टांचा नालायकपणा हाही नाही . नालायकपणा हा आहे कि भारतीय तत्वज्ञानाची चिकित्सा करताना सगळे कम्युनिस्ट फक्त आर्य दर्शनांचाच विचार करतात तुम्हाला अनार्य दर्शने दिसत नाहीत ? हा काय भुक्कडपणा आहे ? हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी आर्यांच्या दर्शनाचा विचार करतात हे मी समजू शकतो कारण हे मुळात एलिट लोकांचे पक्ष आहेत पण तुम्ही श्रमिकांचे कैवारी म्हणवता आदिवासींचे कैवारी म्हणवता आणि तुम्हाला त्यांनी मांडलेली शैव दर्शने साध्या चिकित्सेसाठी घेता येत नाहीत ?कि श्रमिकांना विचार करता येत न्हवता हा भुक्कड पाश्चात्य विचाराने तुम्ही इतके आंधळे झाला कि तुम्हाला इथल्याच श्रमिकांची दर्शने दिसायची बंद झाली ?
आर्य संस्कृती आणि शैव संस्कृती ह्यांच्यातील वाद हा शोषक ऐदी संस्कृती आणि शोषित शूद्र ठरवल्य्या गेलेल्या संस्कृतीतील वाद आहे शूद्र दर्जा हा कायमस्वरूपी स्वस्त कामगार मिळावा म्हणून केलेली योजना असते म्हणूनच शैव सतत वैष्णवीझमबद्दल बोंबा मारत असतात श्रीकृष्ण हा नामधारी क्षत्रिय असतो आणि तो प्रत्यक्षात सैनिकांना फळांची अपेक्षा न करता लढाईत मर असा उपदेश करत असतो हातात शस्त्र न घेणाऱ्या ब्राम्हणांचा तो प्रतिनिधी असतो तो बिनदिक्कत वैश्य शूद्र ह्यांना पाप योनी म्हणत असतो म्हणून त्याच्याविरुद्ध उभे ठाकावे लागते
आपला कामगार वर्ग नेमका कुठला धर्म पाळतो का पाळतो ह्याची चिकित्सासुद्धा तुम्हाला करावीशी वाटत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या आर्य संस्कृतीत डुबक्या घेत आहात असा होतो कामगारवर्ग फक्त गणपती आणि शिवजयंती ह्यांच्याच जयंतीला आणि महाशिवरात्र व कुंभमेळ्याला एव्हढ्या मोठ्या प्रमाणात का जमतो ह्याची काही चिकित्सा कराल कि नाही ?
असो कम्युनिझमशिवाय शैवांचे घोडे पूर्वीही कधी अडले न्हवते आम्ही काही श्रमसंस्कृती मार्क्सकडुन शिकलेलो नाही आमच्यात ती शिव आणि बस्वेश्वरांकडून आलेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा