पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक  भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी युगामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच पुरोगामी विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या वर्गीय किंवा प्रवर्गीय किंवा वर्णीय किंवा जातीय हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे, इतिहास लेखनाचे संबंध हे सुद्धा हितसंबंधांच्या...